Welcome to Sports Vishwa

Sunday, November 25, 2018

फिरकीपटू क्रुणाल पांड्याच्या या चेंडूने बदलला संपूर्ण सामना

सिडनीमध्ये झालेला तिसरा टी20 सामना भारताने एकहाती जिंकला. यात जेवढं श्रेय कर्णधार विराट कोहलीचं आहे, तेवढंच किंबहुना त्याहून जास्त श्रेय फिरकीपटू क्रुणाल पांड्याचं आहे. मौक्याच्याक्षणी क्रुणालने 36 धावा देत 4 गडी बाद करत ऑॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 164 धावांवर रोखले. त्याच्या या कामगिरीमुळे ऑॅस्ट्रेलियाच्या मातीवर सर्वात यशस्वी फिरकीपटूंमध्ये क्रुणाल पांड्याचं नाव अग्रणी आहे.
सिडनी येथे खेळण्यात आलेल्या ऑॅस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताच्या या विजयामुळे टी20 मालिका अनिर्णित राहिली. पहिला सामना ऑॅस्ट्रेलियाने जिंकला होता. तर पावसामुळे दुसरा सामना रद्द करण्यात आला होता. मालिका अनिर्णित राखण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकणं अपिरहार्य होतं. त्याचप्रमाणे 6 गडी राखून भारताने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. ऑॅस्ट्रेलियाच्या टिवटर हँडलवरून त्याच्या या चार विकेटस संक्षिप्त स्वरूपात दाखवण्यात आल्या.
विराटने सामन्यात नाबाद 62 धावांची खेळी खेळली. त्याला साथ दिली ती दिनेश कार्तिकने. ऑॅस्ट्रेलियाने दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी धडाकेबाज सुरूवात केली. त्यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र शिखर धवन 41 (22) पाठोपात रोहित शर्मा 23 (16) बाद झाला. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी धावांचा फलक हलता ठेवायचा प्रयत्न केला.
मात्र विराटला केएल राहुलचा फार साथ मिळाली नाही. 14 (20) धावा करत राहुल तंबूत परतला. त्याच्यानंतर आलेल्या ॠषभ पंतने तर सपशेल निराशा केली. एकही धावा न करता तो शुन्यावर बाद झाला. यानंतर भारत हा सामना जिंकतो की नाही असे वाटत असताना दिनेश कार्तिक आणि विराटने काही सुंदर चौकार आणि षटकार लगावले. अखेर कर्णधार विराट कोहलीने सलग 2 चौकार लगावत सामना भारताच्या नावावर केला.
फिरकीपटू कृणाल पांड्याने कांगारु संघाचे महत्त्वाचे 4 गडी बाद करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कुलदीप यादवने ऑॅस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचला बाद केले. तर कृणालनेही 4 गडी बाद करत ऑॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 164 धावांमध्ये रोखले.
अ‍ॅरॉन फिंच आणि डी शॉर्ट या सलामवीरांनी सुरुवातीला केलेल्या फटकेबाजीमुळे ऑॅस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली. फिंचने 28 धावांची खेळी केली तर शॉर्टने 33 धावा केल्या. पण त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एकामागोमाग बाद झाल्याने ऑॅस्ट्रिलियाचा संघ संकटात सापडला होता. पण पुन्हा अ‍ॅलेक्स करे आणि स्टोनिस यांनी अनुक्रमे 27 आणि 25 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑॅस्ट्रेलियन संघ भारतासमोर 165 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ठेवू शकला.

No comments:

Post a Comment