Welcome to Sports Vishwa
Showing posts with label CRICKET. Show all posts
Showing posts with label CRICKET. Show all posts

Sunday, November 25, 2018

आज आम्ही ऑस्ट्रेलियापेक्षा चांगले होतोत - कोहली

ऑस्ट्रेलिया विरुध्द तिसर्‍या आणि निर्णयाक टि-20 सामन्यात शानदार खेळ करुन मालिका वाचविणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले की आज आम्ही ऑस्ट्र्ेलियापेक्षा चांगले होतोत.
कर्णधार विराट कोहली (नाबाद 61) आणि शिखर धवन (41) यांच्या दमदार फलंदाजलच्या जोरावर भारताने सिडनी क्रिकेट मैदानावर रविवारी खेळण्यात आलेल्या तिसर्‍या आणि आणि निर्णयाक टि-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून पराभूत करुन मालिका 1-1 ने  बरोबरीत आणली.
कोहलीने सामन्यानंतर म्हटले की ज्यावेळी दोघांनी (रोहित शर्मा आणि शिखर धवन) ने आमच्यासाठी काम सोपे केल्याने  गोष्टी खूप सोप्या झाल्या होत्या. आम्ही विचार केला होता की जुन्या चेंडूसह खेळपट्टी मंद होईल परंतु क्रिकेटमध्ये असेच होत असते.
त्याने म्हटले की आपण कधी गती गमवून बसतो आणि परत त्याला मिळवतोत. शेवटी कार्तिकने चांगली फलंदाजी केली. मॅम्सवेल आयिा जम्पा दोघांनीही उत्कृष्ट गोलंदाजी केली. एकूण पाहता क्षमतांच्या जोरावर आम्ही आज ऑस्ट्रेलिया पेक्षा चांगले होतोत.
त्यांने म्हटले की ज्यावेळी आमचे सलामीचे फलंदाज आपल्या लयमध्ये येतात त्यावेळी त्यांना थांबविणे मुश्किल होते आहे. मी तिसर्‍या क्रमांकावर  संघाला लक्ष्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. मला वाटते की हे 180 चा विकेट असेल. दोनीही संघ कसे खेळले हे बरोबरीच्या मालिकेतून दिसून येते.

गांगुली मितालीला बाहेर ठेवल्याने आश्‍चर्यचकित नाही

माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीने सांगितले की महिला टी-20 विश्‍वचषकात इंग्लंडविरूद्ध उपांत्य सामन्यात  मिताली राजला समाविष्ट न करण्याच्या निर्णयाने तो आश्‍चर्यचकित नाही.
सतत दोन अर्धशतक बनऊनही मितालीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळलेला लीग सामना आणि नंतर इंग्लंडविरूद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्याने बाहेर बसवले गेले आणि या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
गांगुलीने येथे टॉलीगंज क्लबमध्ये सांगितले नाही. संघाचे नेतृत्व केल्यानंतर मला बाहेर बसावे लागले. जेव्हा मी मितालीला बेंचवर बसताना पाहिले तर मी सांगितले ’ग्रुपमध्ये तुमचे स्वागत आहे.’
गांगुलीने ग्रेग चॅपलच्यावेळी स्वत:चे उदाहरण देताना सांगितले कर्णधाराला बाहेर बसवण्यासाठी सांगितले जाते, तर तुम्ही असेच करावे. मी पाकिस्तान दौर्‍यावर फैसलाबादमध्ये असे केले होते.
त्यांनी सांगितले जेव्हा मी एकदिवसीय सामन्यात सर्वश्रेष्ठ लयात होतो तेव्हा मी 15 महिन्यापर्यंत एकदिवसीय सामना खेळला नव्हता. आयुष्यात असे होत असते.
त्यांनी सांगितले की मितालीसाठी हा जगााचा शेवट नाही.
माजी कर्णधाराने सांगितले तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही सर्वात चांगले आहात कारण तुम्ही काही केले आणिनंतर एक संधी आहे. यामुळे मितालीला बेंचवर बसण्यासाठी सांगितल्याने मी निराश नाही.
गांगुलीने महेंद्र सिंह धोनीविषयी विचारले गेले जे मागील काही वेळेपासून चांगल्या लयात नाही आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेल्या सध्याचा भारतीय टी-20 आणि एकदिवसीय संघ सहभाग नाही.
माजी कर्णधाराने सांगितले तो (धोनी) एक चॅम्पियन आहे. टी-20 विश्‍वचषक जिंकल्यानंतर मागील 12-13 वर्ष त्याच्यासाठी चांगले राहिले. फक्त त्यांना चांगले प्रदर्शन करायचे आहे.

जिबरान खान इक्वेस्ट्रियन प्रीमियर लीग-2018 चा विजयता

एम्बेसी इंटरनॅशनल राइडिंग स्कूल (ईआयआरएस) चा जिबरान खानने येथे रविवारी झालेल्या इक्वेस्ट्रियन प्रीमियर लीग (ईपीएल) च्या नवव्या संस्करणाचा कप जिंकला.
ही स्पर्धा तीन वर्गामध्ये होती. बालक (80 सेंटीमीटर), ज्युनियर 100 सेंटीमीटर आणि ओपन 120 सेंटीमीटर. जिबरानने आपेन वर्गामध्ये आपला कप जिंकला.
बालक वर्गात शशांक वर्मा (ईआयआरए) आणि ज्युनिअर वर्गात तियाशा वाथुल (सीईओ) ने विजय मिळविला. स्पर्धेतील अंतिम सामन्यात फवाद मिर्झा, आशीष मलिक, जितेंद्र सिंह आणि राकेश कुमार सारख्या शीर्ष भारतीय घोडस्वारांसह प्रशिक्षक रोडोल्फ स्केरेरही उपस्थित होता.
जकार्तामध्ये झालेल्या आशियाई खेळात दोन रौप्य पदक जिंकणारा भारतीय इक्वेस्ट्रियन टिम आणि प्रशिक्षकाला सन्मानीत केले गेले. यावेळी मिर्झाने म्हटले की ईपीएलने एक घोडस्वारीच्या रुपामध्ये माझ्या क्षमतांना प्रकाशात आणले आहे.यामुळे माझे कौशल अधिक चांगले झाले आहे आणि माझ्यामध्ये आत्मविश्‍वास आला. ज्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खूप फायदा मिळाला.

दुबई कसोटी- पाकिस्तानने 5 बाद 418 धावा बनऊन डाव घोषित

हेरिस सोहेल (147) आणि बाबर आजमच्या (नाबाद 127) शतकाच्या मदतीने पाकिस्तानने येथे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळले जाणार्‍या दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी आज (रविवार) पाच गडी बाद 418 धावा बनऊन आपला पहिला डाव घोषित केला.
न्यूझीलंडने याच्या उत्तरात दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत विना एखादे नुकसानीचे 24 धावा बनवल्या. तो सध्या पाकिस्तानच्या स्कोरने 394 धावांनी मागे आहे जेव्हा की त्याचे पूर्ण 10 गडी बाकी आहेत.
स्टंप्सच्यावेळी विजय रावल 31 चेंडूत तीन चौकारच्या मदतीने 17 धावा आणि टॉम लाथम 23 चेंडूवर एक चौकारच्या आधारे पाच धावा बनऊन नाबाद परतले.
यापूर्वी पाकिस्तानने आपला कालचा स्कोर चार गडी बाद 221 धावांनी पुढे खेळणे सुरू केले. सोहेलने 81 आणि बाबर आजमने आपल्या डावाला 14 धावांनी पुढे वाढवले.
सोहेल आणि आजमने सांभाळून खेळताना आपापले शतक पूर्ण केले. सोहेलचे हे दुसरे जेव्हा की आजमचे हे पहिले शतक आहे. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या गडीसाठी 186 धावा जोडल्या.
पाकिस्तानने आपला पाचवा गडी 360 च्या स्कोरवर सोहेलच्या रूपात गमावले. त्याने 421 चेंडुच्या मॅरेथॉन खेळीत 13 चौकार मारले.
आजमने कर्णधार सरफराज अहमद (नाबाद 30) सोबत सहाव्या गडीसाठी 58 धावांची भागीदारी केली. आजमने 263 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकार मारले. सरफराजने 45 चेंडुत तीन चौकार लावले.
त्याच्या व्यतिरिक्त अजहर अलीने 81, असद शफीकने 12 आणि इमाल उल हक तसेच मोहम्मद हफीजने नऊ-नऊ धावा बनवल्या.
न्यूझीलंडकडून कोलिन डी ग्रँडहोमला दोन आणि पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करून सामना जिंकणारा एजाज पटेल आणि ट्रेंट बोल्टने एक-एक गडी बाद केला.

मिताली मामल्यावर सीओएने स्पष्टीकरण मागितले

महिला टी-20 विश्‍वचषकात इंग्लंडविरूद्ध भारताच्या उपांत्य सामन्यात मिताली राजला संघात समाविष्ट न केल्यामुळे उठलेल्या वादाने मोठे रूप घेतले.
वेबसाइट ’ईएसपीएन’ च्या वृत्तानुसार या वाढलेल्या वादामुळे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या (बीसीसीआय) प्रशासकांच्या समितीने (सीओए) स्पर्धेत मितालीचे फिटनेसची माहिती मागितली आहे. उद्या सोमवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश पवार आणि व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य उद्या सोमवारी सीओए आणि जोहरी यांची भेट घेऊन टी-20 विश्‍वचषकात भारतीय संघाच्या प्रदर्शनाचा  रिपोर्टही सोपवेल.
सीओएने उपांत्य सामन्यापूर्वी झालेल्या निवड समितीच्या बैठकीची माहिती मीडियामध्ये लीक झाल्यावर चिंताही वर्तवली आणि या मामल्यात बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीसहित मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
उल्लेखनीय आहे की इंग्लंडविरूद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यात संघाची सर्वात अनुभवी फलंदाज मितालीला बेंचवर बसवण्यात आले आणि या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मितालीला उपांत्य सामन्यात समाविष्ट न करण्याचे वाद निर्माण झाला आणि त्यानो आता मोठे रूप घेतले.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे मिताली बाहेर होती परंतु त्यापूर्वी खेळलेल्या दोन सामन्यात त्याने सतत अर्धशतकीय खेळी खेळली होती. उपांत्य सामन्याने एक दिवसापूर्वी त्यांना फिट घोषित करण्यात आले होते. तरी देखील याच्या व्यवस्थापनाने त्यांना बेंंचवर बसून ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय प्राप्त करणार्‍या अंतिम एकादशला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाविषयी प्रतिक्रिया देताना तृप्तीने सांगितले एक व्यवस्थापक म्हणून मी बैठक बोलवली. कर्णधार आणि निवडकर्ताने खेळपट्टीविषयी चर्चा केली आणि प्रशिक्षकाने हे दर्शवले की ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय प्राप्त करणार्‍या अंतिम एकादशला उपांत्य सामन्यासाठी कायम ठेवायला पाहिजे.